प्रश्नकर्ता: मला जवळ असणारे लोक माझ्या कर्मात भर घालत आहेत का? असे असेल तर, मी याला कसे हाताळायचे? 

सद्गुरू: असा विचार करू नका की तुमच्या कुटुंबाला शुद्ध करण्याची गरज आहे! कोण जाणे, कोण कोणाचे कर्म भोगत आहे. कदाचित त्यांचे म्हणणे काहीतरी वेगळे असेल! जर तुम्हाला वाटते, की तुमचे कुटुंब वाईट आहे - ते तसे झाले असतील, पण कदाचित ते तसेच राहणार नाहीत. चंद्राप्रमाणे त्यांच्यासुद्धा अवस्था  असतात. त्यांचे सुद्धा सुखद आणि दुःखद चेहरे असतात. हे असे घडण्याचे कारण की कुटुंबामध्ये जास्त जवळीक असते.

तुमचे आयुष्य, तुमची जबाबदारी

तुमच्या आयुष्यात जे काही घडते, ती तुमची जबाबदारी आहे. याचा अर्थ ते तुमचे कर्म आहे, ते तुम्ही केलेले आहे. जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असता आणि "कर्म" शब्द उच्चारता, तो नेहमी स्वतःच्या संदर्भात असावा. हा एकदम चुकीचा दृष्टीकोन आहे की, एखादा वाईट परिस्थितीतून जात असताना त्याचाबद्दल ग्रह बनवणे आणि विचार करणे की ते त्याचे कर्म आहे. तुम्ही तुमची माणुसकी हरवून बसाल. दुसऱ्याचे कर्म हा कधीच तुमचा प्रश्न नसतो. हे तुमचे कर्म आहे, की दुसऱ्या मनुष्यासोबत काही अप्रिय घडताना तुम्हाला साक्षी व्हावे लागले.

जे काही घडते ते तुमच्यामुळेच. ते तुमच्या जीवनात घडत आहे, तर ते तुमचे कर्म आहे. तुम्ही आजूबाजूच्या लोकांपासून दुःख भोगत आहात किंवा आनंद, ते सर्व तुमचे कर्म आहे.

ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या कर्माचा संदर्भ घेता, तुम्ही एक दुष्ट शक्ती बनाल. दुष्ट हे नेहमीच हेतूपूर्वक नसते. दुष्ट म्हणजे तुम्ही असे आहात, की तुम्ही काहीही जरी केले, तरी ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी नकारात्मक ठरते. ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या कर्मा बद्दल विचार करता, तेव्हा तुम्ही त्याच दिशेने जात आहात.

अध्यात्मातून आम्ही हेच साधण्याचा प्रयत्न करतो - की तुम्हाला याची जाणीव व्हावी की जे काही घडते ते तुमच्यामुळेच. ते तुमच्या जीवनात घडत आहे, तर ते तुमचे कर्म आहे. तुम्ही आजूबाजूच्या लोकांपासून दुःख भोगत आहात किंवा आनंद, ते सर्व तुमचे कर्म आहे.

म्हणून कुटुंबाकडून येणाऱ्या कर्माबद्दल चिंता करू नका - असे काही नसते. "कुटुंब" फक्त तुमच्या मनात असते. कोण तुमचे कुटुंब आहे आणि कोण नाही, कोण तुमच्या जवळचा आहे आणि कोण नाही, याची कल्पना पूर्णपणे तुमच्या मनात निर्माण झालेली असते. जर तुमच्याकडे मन नसते, तर कुटुंबाची संकल्पना तुमच्यासाठी अस्तित्वात नसती. म्हणजे ते तुमचे कृत्य आहे, तुमचे कर्म आहे. तुम्हाला अशी जाणीव होण्याची गरज आहे, की तुमच्या आयुष्यात जे काही घडते, ते तुमच्यामुळेच. एकदा तुम्हाला या गोष्टीची जाणीव झाली, की तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती बनता. अन्यथा, तुम्ही विखुरलेले राहता. कारण लोक इतके विखुरलेले असतात, इतक्या गोष्टींशी स्वतःची ओळख जोडून घेत असतात, की त्यांना एका स्वाभाविक पूर्णतेत यायला खूप वेळ लागतो. एकदा का हे घडले, की तुम्ही ज्याचा शोध घेत आहात, ते क्षणात तुमचे होऊ शकते.