भारतीय परंपरेत गुरुपौर्णिमा हजारो वर्षे साजरी केली जात आहे आणि आजही हा उत्सव टिकून आहे. या निमित्ताने सदगुरू, गुरुपौर्णिमेशी संबंधित अनेक कथांवर प्रकाश टाकत आहेत. आदियोगींनी पहिल्या सात ऋशींना म्हणजेच सप्तर्षींना योगशास्त्र ज्या वेळी प्रदान केले तेव्हापासून ते भगवान बुद्धाने भिक्षूंना दिलेल्या दीक्षेपर्यंत आणि अलीकडच्या काळात ऋतुमानानुसार चालणा-या साधकांच्या धार्मिक यात्रेपर्यंत अशा अनेक कथांविषयी सदगुरू मार्गदर्शन करताहेत.