Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
तुमचं रोजचं वेळापत्रक तुम्हाला मारत नाहीये, तर तुमचं विचार आणि भावना यामध्ये गुरफटून जाणं तुम्हाला मारत आहे.
व्यत्यय हा तेव्हाच व्यत्यय ठरतो, जेव्हा तुम्ही स्वतःला त्यासाठी तयार केलेले नसते. जेव्हा तुम्ही आवश्यक ते 'आंतरिक कार्य' करता, तेव्हा तो पुढे जाण्यासाठीच्या पायरीचा एक दगड बनतो.
डोक्यात कोणतीही स्पष्टता नसताना देखील लोक प्रचंड आत्मविश्वासपूर्ण असतात. ही एक आपत्ती आहे.
जेव्हा तुमचे हृदय तृप्त आणि मन 'स्व'पासून मुक्त असते, तेव्हा तुमचे पाय आपोआप नाचू लागतील.
चांगुलपणा ही एक गृहीत धरलेली भूमिका आहे. आनंद हाच खरा अनुभव आहे.
जर तुम्ही या विश्वाच्या दुसऱ्या एखाद्या जागेवरून पृथ्वीकडे पाहाल, तर आपण सर्वजण वैश्विक अस्तित्व आहोत.
याच दिवशी, गौतम बुद्धांना हा साक्षात्कार झाला की, 'सत्याकडे जाणे' असे काही नसते. जर तुम्ही उपलब्ध असाल, तर ते अगदी इथेच आहे.
तुम्ही हजार वर्ष जगलात तरीही मानवी कल्पनाशक्ती आणि आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत. तर मग आपण 'आनंदी अपयशी' होऊया.
मानवी जीवन केवळ उदर्निर्वाहापुरते मर्यादित नसते. उदर्निर्वाहाची काळजी घेतल्यानंतरच मानवी जीवनाची सुरुवात होते.
प्रेम हा काही व्यवहार नाही. प्रेम ही एक सुंदर गोष्ट आहे, जी तुमच्या अंतर्मनात घडते. ते कदाचित बाहेर व्यक्त होऊ शकेल; पण त्याचा उगम मात्र आतूनच झालेला असतो.
कोणालाही खुश करण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही खरोखर आनंदी असाल आणि तुमची माणुसकी ओसंडून वाहत असेल, तर तुमचे सर्वांशी संबंध चांगले राहतील..
अपराधबोध ही समाजाने जोपासलेली एक भावना आहे — स्वतःच्याच दिशेने रोखलेलं एक विष.