स्वप्ने आणि कर्म - भाग २
दोन भागांपैकी या दुसऱ्या भागात, सद्गुरू स्वप्नांच्या स्वरूपाबद्दल आणि ते कर्माच्या उलगडण्याशी कशी जोडली जातात याबद्दल सांगतात.

दोन भागांपैकी या दुसऱ्या भागात, सद्गुरू स्वप्नांच्या स्वरूपाबद्दल आणि ते कर्माच्या उलगडण्याशी कशी जोडली जातात याबद्दल सांगतात.
सद्गुरू: कर्म म्हणजे अनेक गोष्टी आहेत. सध्याच्या आपल्या समजुतीनुसार, आपण याच कर्माबद्दल वेगवेगळ्या पातळ्यांवर बोलतो. कर्म म्हणजे कृती. कोणाची कृती? "माझी कृती." पहिली गोष्ट म्हणजे हे समजून घेणे की, "हे उलगडणे फक्त यामुळे घडत आहे, कारण गुंडाळणे देखील मीच केले आहे." हे उलगडणे इतके स्वयंचलित असते की, "यात माझा सहभाग सुद्धा लागत नाही. ते फक्त घडत राहते. माझा राग फक्त घडतो, माझे विचार फक्त येतात, माझ्या भावना फक्त उद्भवतात," आणि यासाठी कोणताही हेतू किंवा सहभाग लागत नाही. ते सहज घडत राहते. असे वाटते, की दुसरेच कोणीतरी हे सर्व करत आहे. जर तुम्ही काही काळ शांत राहिलात आणि मनाचे थोडे निरीक्षण केले, तर असे वाटते की तुम्हाला दुसरेच कोणी चालवत आहे. जणू ते स्वतःहूनच काहीतरी करत आहे. पण ते फक्त तुम्ही केलेल्या गोष्टींनाच उलगडत आहे.
आता, जीवन म्हणजे सर्वकाही करणे आणि स्वप्न म्हणजे सर्वकाही उलगडणे आहे का? नाही. जीवन हे करणे आणि उलगडण्याचे मिश्रण आहे. जितके तुम्ही अजागरूक असाल, तितके जास्त उलगडणे होत असते. जर तुम्ही थोडेसे जागृत झालात, तर तुम्ही बरेच जास्त कार्य कराल. जर तुम्ही पूर्णपणे जागृत झालात, तर उलगडणे खूप लवकर होईल, करणे पूर्णपणे थांबेल. जागृतीची अर्धवट पातळी नेहमीच उलगडण्यापेक्षा ‘करणे’ जास्त करते. उदाहरणार्थ, एक साधा शेतकरी त्याचे कर्म फक्त उलगडत असतो. तो जास्त गोष्टी जमा करत नाही. तो सकाळी उठतो, त्याची जमीन नांगरतो, त्याच्या जनावरांची काळजी घेतो, साध्या गोष्टी करतो, ज्या त्याला कराव्या लागतात आणि बस्स. तो जग कसे जिंकायचे याबद्दल विचार करत नाही किंवा त्यासाठी काम करत नाही. त्यामुळे त्याचे जीवन बहुतांश उलगडणे आहे. असे नाही की, तो मुळीच काही करत नाही, पण त्याचे करणे हे उलगडण्यापेक्षा खूप कमी आहे, कारण त्याची जीवनशैली जास्त करण्याला परवानगी देत नाही.पण एकदा तुम्ही शिक्षित झालात, की तुमचे करणे आणि उलगडणे चांगलेच मिसळून जाते, तुम्ही एकाच वेळी उलगडणे आणि करणे करू शकता.
शिक्षणाची भूमिका
एका पातळीवर, तुमचे विचार आणि भावना या अजाणतेपणी विलीन होत असतात. दुसऱ्या पातळीवर, तुमच्याकडे ते पूर्ण करण्यासाठी हेतू असतात. हे लोकांसोबत नेहमीच घडत असते. मी सर्व दोष शिक्षणाला देऊ इच्छित नाही, पण सामान्यतः, तुम्हाला मिळालेले शिक्षण हेच याचे कारण आहे - ते तुमच्यात ठोस ध्येय निर्माण करते. आजची शिक्षणपद्धती ही जाणून घेण्याची प्रक्रिया नाही, ही अनुभवी होण्याची प्रक्रिया नाही, ही तुमचे शरीर किंवा मन त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत विकसित करण्याची प्रक्रिया नाही. ती तुमच्यात खूप मजबूत इच्छा आणि महत्वाकांक्षा निर्माण करते.
सुशिक्षित लोक अमर्याद इच्छांमुळे त्रस्त आहेत. ते पोटभर जेवल्यानंतरही आनंदाने बसू आणि झोपू शकत नाहीत. जेवताना ते व्यवसायाबद्दल बोलत असतात. त्यांनी जगाचा उद्धार करण्याचे काम हाती घेतले आहे, काहीतरी निर्माण करायचे आहे, काहीतरी बांधायचे आहे, त्यांना त्यांचे जीवन किंवा प्रत्येकाचे जीवन सुंदर करायचे आहे म्हणून नाही; तर ते फक्त त्यांचा मूर्खपणाच्या गोष्टी अधिक प्रमाणात करू इच्छितात, कारण कोणत्याही विशिष्ट हेतूशिवाय खूप मजबूत ध्येय स्थापित केली गेली आहेत. हेतू हे कर्म निर्माण करण्याचे एक शक्तिशाली साधन आहे. कृतीमुळे नाही, तर हेतूमुळे कर्म निर्माण होते.
कर्माच्या प्रक्रियेत, कृतीमुळे उलगडणे होत आहे. मजबूत हेतूंमुळे गुंडाळणे होत आहे. जितका तुम्ही स्वतःबद्दल विचार कराल, तितके तुमचे हेतू ठाम होत जातील. मी जेव्हा हेतूंबद्दल बोलतो, तेव्हा मी महान हेतूंबद्दल बोलत नाही - मी ठाम हेतूंबद्दल बोलत आहे. जेव्हा तुम्ही रागात असता, तेव्हा तुम्ही उलगडत असू शकता, पण तुम्ही गुंडाळतही असू शकता. तुम्ही फक्त रागात फुटू शकता आणि शांत होऊ शकता. किंवा तुम्ही रागात फुटू शकता आणि मग एक हेतू तयार करू शकता: "तुम्हाला माहीत आहे का त्याचे काय करायचे आहे?" आता तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंडाळत आहात. राग हा फक्त एक स्फोट आहे. राग हा तुमच्या आत घडलेल्या काहीतरीचे उलगडणे आहे. राग द्वेष निर्माण करू शकतो. द्वेष हा एक हेतू आहे. द्वेष हा असा राग आहे, ज्याने हेतू धारण केला आहे. मत्सर हे उलगडणे असू शकते, आपण म्हणू शकतो की ईर्ष्या हा एक हेतू आहे - असा मत्सर आहे ज्याने हेतू धारण केला आहे. आता, जरी तुम्ही रागात असलात, एका विशिष्ट शांतपणासह, जर तुम्ही द्वेषपूर्ण बनलात, तर तुम्ही तुमचा राग किंवा द्वेष यापुढे दाखवत नाही. तुम्ही शांत चेहरा ठेवता आणि तापट गोष्टी करता, नाही का? उदाहरणार्थ, वासना म्हणजे एकप्रकारचे उलगडणे आहे. आकांक्षा हे गुंडाळणे आहे, कारण तो एक हेतू आहे.
तथाकथित सभ्यता
तुमच्या मनात येणाऱ्या सर्व विचारांना आणि भावनांना जर तुम्ही मोकळी वाट करून दिलीत, तर तुम्ही अक्षरशः रानटी वाटाल. सभ्यतेसाठी तुम्ही एक हेतू तयार करता – हेच गुंतणे आहे. ही तथाकथित सभ्यता म्हणजे आत्महत्याच आहे, कारण तुम्ही सावरण्यापेक्षा जास्त वेगाने सतत गुंतत जाता. मनाची द्विधा अवस्था होते - ते एका पातळीवर सावरत असते, तर दुसऱ्या पातळीवर त्याचे स्वतःचे हेतू असतात. तथाकथित सभ्य लोकांकडे पाहा – जेव्हा मी "सभ्य" म्हणतो, तेव्हा मी सामाजिकदृष्ट्या सभ्य लोकांबद्दल बोलतो आहे, खरोखर सभ्य लोकांबद्दल नाही – ते नेहमी साधारण लोकांपेक्षा जास्त दुःखी असतात. साधारण लोकांचा राग, द्वेष आणि पूर्वग्रह उघडपणे व्यक्त होतात. ते कदाचित अरसिक वाटतील पण धूर्तपणात ते तथाकथित सभ्य लोकांपेक्षा खूप कमी असतात. जास्त सभ्य लोक सुरुवातीला इतरांना फसवायला शिकतात. काही काळानंतर ते पारंगत होतात, पण स्वतःही फसू शकतात. त्यांचे हेतू त्यांनाही कळत नाहीत.
शिक्षण क्षमता वाढवते, कारण ते तुम्हाला विविध प्रकारचा अनुभव, ज्ञान देते. पण मानवी मन कसे काम करते, ते कसे विकसित होते, कसे ते फुलू शकते, कशाने ते मलीन होऊ शकते – या गोष्टींकडे खोलात जाऊन पाहिले जात नाही. सर्व प्रकारच्या लोकांना सर्व प्रकारांमध्ये माहिती उपलब्ध होते, त्यामुळे दुर्दैवाने लोक स्वतःला अधिक गुंतवण्यासाठी शिक्षणाचा वापर करत आहेत. त्यांच्या भोवतालच्या जगाबाबत, माहितीच्या बाबतीत ते जास्त जाणत असतील, पण जीवनप्रक्रियेच्या बाबतीत शिक्षित लोक हे सामान्यतः निरक्षरांपेक्षा अधिक अज्ञानी असतात. भारतातील एखाद्या साध्या निरक्षर शेतकऱ्याच्या घरी गेलात, तर त्याची जीवनाची समज, त्याच्या शरीराची समज, त्याची भौतिकतेची समज, कोणाबरोबर कसे रहावे, वागावे आणि कसे नाही याची समज ही जगातील बहुतेक शिक्षित समुदायांपेक्षा खूप स्पष्ट आणि जाणीवपूर्वक असते. कारण त्याच्या मनात इतके गोंधळवणारे विचार नसतात. तो डोक्याने ढिला नसतो, जे बऱ्याच शिक्षित लोकांच्या बाबतीत झाले आहे. याला शिक्षण स्वतः दोषी नाही, तर स्वतःच्या कल्याणासाठी त्याचा कसा वापर करावा याबद्दल कोणतेही मार्गदर्शन नसल्यामुळे हे घडते. त्यामुळे ज्या शिक्षणाने समाजाचे सशक्तीकरण व्हायला हवे होते, स्पष्टता यायला हवी होती, परंतु दुर्दैवाने त्याने जीवनप्रक्रियेबद्दल अधिकच गोंधळ निर्माण केला आहे.
म्हणून जागृती आणि स्वप्न – या दोन्हींमध्ये फरक करू नये हे उत्तम. मला वाटते की, तुम्ही या दोन्ही अवस्था स्वप्न म्हणून पाहा, किंवा दोन्ही अवस्था जागरूकतेच्या वेगवेगळ्या पातळ्या म्हणून पाहा. हे एक प्रकारचे स्वप्न आहे, जे गहन स्वप्न आहे; किंवा ही एक प्रकारची वास्तविकता आहे, जी एका प्रकारे प्रखर वास्तविकता आहे. जर तुम्ही असे पाहिलेत, तर तुम्ही दोन्ही गोष्टींना, गुंतवण्याऐवजी उलगडण्याची प्रक्रिया बनवू शकता.