दहशतवादाचा उद्देश युद्ध नाही, तर समाजाला भीतीने पांगळं करणं आहे. दहशत पसरवणे, समाजात फूट पाडणे, देशाच्या आर्थिक विकासाला अडथळा आणणे आणि प्रत्येक स्तरावर अराजकता निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जर आपल्याला या राष्ट्राचे सार्वभौमत्व टिकवून ठेवायचे असेल आणि त्याचे पोषण करायचे असेल, तर या घटकांना कठोरपणे आणि दीर्घकालीन दृढनिश्चयाने हाताळले पाहिजे. यासाठी मोठे, दीर्घकालीन उपाय आहेत - सर्व स्तरांवर शिक्षण, आर्थिक संधी, संपत्ती आणि लाभ यांचे समान वितरण. सध्या, धर्म, जात, पंथ किंवा राजकीय संलग्नतेच्या सर्व संकुचित भेदभावांच्या पलीकडे एक राष्ट्र म्हणून एकत्र उभे राहणे आणि सर्व स्तरांवर आपल्या सुरक्षा दलांना त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी पाठिंबा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व शोकग्रस्त आणि जखमींना आमच्या मनापासून संवेदना आणि आशीर्वाद - सद्गुरू
video
May 1, 2025
Subscribe