प्रश्नकर्ता: सदगुरू, आनंद आणि सुख याबद्दल तुमचे व्याख्यान मी ऐकले होते. आपण असे म्हणालात की तुमचा आनंद तुमच्या स्वतःवर, तर सुख इतरांवर अवलंबून असते. मी थोडा वेळ प्रयत्न केला परंतु मला असं जाणवलं की ते छोटे छोटे आनंदाचे क्षण टिकवून ठेवण्यास मी असमर्थ होते. जेव्हा मी पूर्णतः त्यात सामील होते तेव्हा मी खूप आनंद अनुभवला.  काय करावे याबद्दल खूप उत्साही होते, परंतु जेव्हा इतर व्यक्ती किंवा काही बाह्य गोष्टी मी काय करतो ते पाहते तेव्हा तो आनंद नाहीसा होतो. तर मग सुखाच्या भोगांनां बळी न पडता आपण ते आनंदाचे क्षण कसे टिकवू शकतो?  जर हरकत नसेल तर येथे उपस्थित जिज्ञासूंनां आनंद आणि सुख यामधील फरक समजावून सांगावा.

सदगुरू:  हे पहा ,आता जर मी तुम्हाला म्हटलं की ... किंवा समजा तूम्ही... मी नव्हे.... असं समजा, तुमच्या डीनने तुम्हाला उद्यापासून तुम्ही सर्वांनी कुठल्या प्रकारचे कपडे घालायचे हे सांगितलं तर तुम्ही लगेच महाविद्यालयात निषेध मोर्चा कराल. जर तुमचे डीन दुसरा आदेश काढतात, प्रत्येकाने सकाळी फक्त चार इडली खाल्ल्या पाहिजेत.  जर तुमचे डीन म्हणाले प्रत्येकाने पहाटे पाचला उठलं पाहिजे.  समजा त्यांनी असे दहा वेगवेगळे नियम बनवले, शारीरिक कामं करायला लावली, तर तुम्हाला वाटेल तो तुम्हाला गुलाम बनवत आहेत आणि तुम्ही तुमच्या स्वातंत्र्यासाठी आरडा ओरडा कराल, नाही का? पण स्वतःकडे जरा लक्ष द्या आणि पहा. आत्ताच दुसरे कोणीतरी, तुमच्या आजूबाजूला काय घडावं हे ठरवत असेल, तुम्हाला ती गुलामी वाटते, पण जर कोणी तुमच्या अंतरी काय घडावं हे ठरवित आहे, हि गुलामगिरी नाही का?  इतर कोणी तुम्हाला आनंदी किंवा दुःखी करत आहे हि गुलामगिरी नाही का? इतर कोणी तुम्हाला प्रिय किंवा अप्रिय व्यक्ती करत असेल तर ही गुलामगिरी नाही का?

तुमच्या अंतरंगात काय घडावं हे कोणीतरी दुसरा ठरवतो - हा गुलामीचा सर्वात वाईट प्रकारआहे, नाही का? फरक एवडाच की प्रत्येकजण तसा आहे, म्हणून ते नॉर्मल वाटतं.  पण ते तसं नाही. हे नॉर्मल नव्हे.  सर्वजण तसे आहे म्हणून, हे नॉर्मल होऊ शकत नाही.  हि व्यक्ती, तुमच्या सभोवतालचे जीवन... शंभर टक्के तुम्हाला जसं हवं तसं कधीच होणार नाही, आणि ते घडूही नये; कारण समजा सर्वकाही तुम्हाला हवं तसं घडलं तर मी कुठे जाऊ? मला खूप बरं वाटतं कि सर्वकाही तुमच्या इच्छेनुसार घडत नाही. आणि आता तू एक विद्यार्थीनी आहेस.  मला वाटतं साठ ते सत्तर टक्के गोष्टी तुझ्या इच्छेनुसार घडत असतील. जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा हि टक्केवारी उलट होईल. मला माहित नाही. मला माहिती नाही ते कोणत्या दिशेनं जाईल. म्हणून... तुमच्या सभोवतालचे जीवन शंभर टक्के तुम्हाला हवं तसं कधीच होणार नाही.  आणि ते तसं होऊ सुद्धा नये.  हो! तुम्ही जर यंत्रांसोबत रहात असाल तर,  पण जीवन हवं तसं घडणार नाही आणि त्या मशीन्स सुद्धा तुमच्यावर वैतागतील, नाही का?  तुम्ही पाहिलं असेलच, या मशीन्स दररोज काहीना काही करून आपल्याला त्रास देत असतात.  हो नक्कीच त्रास देतात.

तर बाह्य जग कधीच शंभर टक्के तुमच्या इच्छेनुसार नाही घडणार.  म्हणून तुमचं सुख किंवा तुमचा आनंद.... वास्तविक आपण इतके शब्द प्रयोग करायची गरज नाही  मुलभूतपणे हा सुखावह गोष्टींची आवड आणि दुखावह गोष्टींची नावड या दोघांमधील संघर्ष आहे.  त्याचं असं आहे, सुखासाठी आपल्याजवळ अनेक नावं आहेत. आपण त्याला शांती, आनंद, सुख, अत्यानंद, परमानंद म्हणतो. दुःखाला देखील आपल्याजवळ अनेक नावं आहेत - स्ट्रेस, चिंता, भय, तणाव, टेन्शन आणि अजून काय काय, वेडेपणा, काहीही असो. सुख विरुद्ध दुःख - तुमचे सुख तुमच्या सभोवताली काय घडते यावर अवलंबून असेल, तर सदा आनंदी असणं खूप दुरापास्त आहे, नाही का?  व्यवहाराचा मुलभूत स्वभावच असा आहे की ते अशक्य आहे.  केवळ तूम्ही; हे आणि ते यांमध्ये अंतर निर्माण केलं तरच हे शक्य आहे. बऱ्याच लोकांना एक सवय असते, अपेक्षेप्रमाणे जेंव्हा काही गोष्टी घडत नाहीतते वर बघतात आणि म्हणतात, उपरवाला! नाही का? संपूर्ण जग वर पहात आहे.

वर पहा, तुम्हाला माहित आहे, पृथ्वी गोल आहे? तुम्हाला हे माहित आहे ना? ठीक आहे. ग्रह गोल आहे. आणि तुम्ही उत्तर ध्रुवावर नाही, तुम्ही चेन्नईत आहात-इथे उष्ण कटिबंधीय वातावरणामध्ये आणि ग्रह प्रचंड वेगाने फिरतो आहे, अशा स्थितीत जर तुम्ही वर पाहत असाल तर तुम्ही हमखास चुकीच्या दिशेनेच पाहाल.  हो कि नाही? तुम्ही नक्कीच नेहमी चुकीच्या दिशेने पहात आहात. नाही का? कदाचित एखाद्या विशिष्ट क्षणी, ग्रीनविच मीन टाइम, झीरो अवर, वगैरे, याक्षणी तुम्ही वर पाहिलं तर बहुतेक स्वर्गाच्या दिशेने पाहू शकाल; पण इतर वेळी तुम्ही नेहमी चुकीच्याच दिशेने पहात असणार.  नाही का? तर या विश्वाच्या अनंत पसाऱ्यात, कोणती बाजू वर कोणती बाजू खाली कुणाला ठाऊक आहे? कुणाला तरी माहित आहे का?  कुठे तरी सांकेतिक लिहिलं आहे का,धिस साईड अप  म्हणून? कुणालाच माहीत नाही, कोणती बाजू खाली कोणती बाजु वर आहे, फक्त गृहीत धरून सर्व चाललं आहे, नाही का? तुम्हाला खऱ्या अर्थाने माहिती आहे का कोणती दिशा उत्तर आहे किंवा कोणती दिशा दक्षिण आहे? रं म्हणजे उत्तर आणि दक्षिण म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? केवळ आमच्या सोयीसाठी आपण ठरवलेलं आहे. हो की नाही?

तुम्हाला माहित आहे का पूर्व आणि पश्चिम काय आहे? नाही. पुढे किंवा मागे म्हणजे काय हे तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्हाला माहित नाही. तुम्हाला यापैकी काहीही माहित नाही. तुम्हाला केवळ एका गोष्टीची खात्री आहे ती म्हणजे, तुम्हाला एवढं माहिती आहे की तुमच्या आतील आणि तुमच्या बाहेर.  केवळ ही एकच गोष्ट तुम्हाला खात्रीपूर्वक माहित आहे, नाही का?  हे आंतील, आणि हे बाहेरील.  हि एकच एक सुविधा तुमच्याजवळ आहे.   बाहेर काय आहे आणि आंत काय आहे, हे एवढंच तुम्हाला कळतं.  समजा जर कधी तुम्हाला आत्मज्ञान झालं तर मग हे देखील तुम्हाला कळणार नाही. होय ,माझ्याबाबतीत हेच घडलं -  मला हे कळेनासे झालं की माझ्या आतील कोणतं, माझ्या बाहेरील कोणतं.  जे मी आहे, जे मी नाही हे काहीच कळेनासं झालं.  मी हे आहे कि मी ते आहे काहीच कळेनासं झाल्यामुळे मी सर्वकाही झालो आणि संपूर्ण विश्वभर पसरलो गेलो.  मग आता तुम्ही म्हणता, “आतील काय आणि बाहेरील काय आहे हे मला कळतं”.  तर या बद्दल थोडं अधिक जाणून घेउया. तुम्ही सर्व आता मला पाहू शकता का? जरा, मी कुठं आहे हे दाखवू शकता का? आपले हात वापरा आणि दाखवा मी कुठे आहे. तुम्ही मला पाहू शकता का? नाही. तुम्ही चुकलात. तुम्हाला माहित आहे ना मी एक द्रष्टा आहे? तुम्हाला माहितच नाही मी कुठं आहे.

आता हा प्रकाश माझ्यावर पडत आहे, परावर्तित होत, तुमच्या डोळ्यांच्या लेन्समधून जात, तुमच्या रेटिनावर उलटी प्रतिमा विज्ञानातील ही सगळी गोष्ट तुम्हाला माहित आहे ना? तर आत्ता मला सांगा, तुम्ही मला कुठे पाहत आहात? स्वत: मध्येच.  तुम्ही मला कुठे ऐकता आहात? स्वत: मध्येच. संपूर्ण जग तुम्ही कुठं पाहिलं? स्वत: मध्येच.  आजपर्यंत तुम्ही  स्वतःच्या बाहेर काहीतरी अनुभवलंय का? तुमच्या बाबतीत जे काही घडलं - अंधार आणि प्रकाश तुमच्या आतच घडले, सुख दुःख तुमच्या आतच घडले, आनंद आणि क्लेश तुमच्या आतच घडले.  कधीतरी काही तुम्ही तुमच्या बाहेर अनुभवलंय का? नाही. म्हणून मी तुम्हाला विचारत आहे - तुमच्या आत काय घडतं, ते कसं घडावं हे कुणी ठरवावं? तुमच्या आत काय घडतं, ते कसं घडावं हे कुणी ठरवायचं? कोणीतरी दुसऱ्याने? निश्चितपणे तुमच्या आत काय घडतं हे तुम्ही ठरवायला हवं. नाही का?

म्हणून जर आपल्या आतमध्ये काय घडतं हे जर आपण ठरवलं, तर तुमचा संपूर्ण जीवनानुभव तुम्ही स्वतः निर्धारित कराल, तुमच्याशिवाय इतर कोणी नाही, हो ना? तुमच्या सभोवतालच्या घटना तुम्ही निर्धारित करू शकत नसाल, परंतु जर तुम्ही जबाबदारी घेतली तर, या पृथ्वीवरील तुमचा जीवनानुभव शंभर टक्के तुम्ही निर्धारित करू शकाल. पण जर ते असंच ढिलं सोडलं तर कोणीही हवं ते करतील.  ते नक्कीच असं करतील पण अजाणतेपणे , कारण ते देखील तुमच्यासारखेच अजाण.