Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
ज्यांनी सुरक्षित असण्याची आवश्यकता सोडली आहे, खरंतर तेच सुरक्षित आहेत.
शरीर आणि मन यांचा सखोलपणे संबंधित आहेत. शरीर स्थिर झाले की मग स्वाभाविकपणे मन तसेच बनते.
मानव असणे म्हणजे निसर्गाच्या तथाकथित नियमांच्या पलीकडे जाऊन आपल्यापेक्षा मोठं काहीतरी घडवून आणण्याची क्षमता असणे.
तुमच्या पूर्वजांना सापळा नव्हे तर पायरीचा दगड बनवा. महालय अमावस्या ही शक्यता निर्माण करते.
प्रेम हे कुणा एखाद्याबद्दल नसतं. प्रेम ही एखादी कृती नाही. तुम्ही 'ज्या प्रकारे आहात' तेच प्रेम आहे.
भीती ही अजागरूक असण्याचा परिणाम आहे. भीती आपल्याला वाचवणार नाही. केवळ जागरूक राहूनच आपण खऱ्या अर्थाने जीवन निर्माण करू शकतो.
आत्मसाक्षात्कार हा प्रकाशित होण्याबद्दल नाही - तो प्रकाश आणि अंधार यांच्या पलीकडे असणाऱ्या दृष्टीबद्दल आहे.
तुम्हाला आवडो किंवा न आवडो, जीवन तुम्हाला सर्व प्रकारची सर्कस, खेळ आणि कसरत करायला लावेल. तुम्ही जर तयार आहात, तर ते आनंदाने करू शकता.
ज्याला देवीची कृपा प्राप्त होते तो धन्य होतो. मग तुम्ही असं जीवन जगाल जे तुमच्या कल्पनेच्या, वृत्तींच्या आणि क्षमतांच्या पलीकडे असेल.
स्त्री तत्व हे जीवनाचे एक शक्तिशाली आयाम आहे. स्त्री तत्व किंवा शक्ती या शिवाय, काहीही अस्तित्वात नसेल.
नवरात्री साजरी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे उत्सव भावना जोपासणे. जीवनाचं रहस्य हेच आहे की: गंभीर न होता संपूर्णपणे सहभागी होणे.
जमिनीवर खंबीरपणे उभं राहणं आणि तरीही आकाशाला स्पर्श करणं हे आध्यात्मिक प्रक्रियेचं सार आहे.