FILTERS:
SORT BY:
कालभैरव केवळ मृत्यूबद्दल नाही, तर तो वेळेबद्दल आहे. तुमच्या जीवनाची गुणवत्ता ही मुळात तुम्ही तुमचा वेळ कसा वापरता यावर अवलंबून असते.
जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत निःशब्द व्हाल, तेव्हा तुम्हाला जीवनाचा बोध अशा प्रकारे होईल की, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही - ते अत्यंत गहनपणे जाणवेल.
जर तुमच्या हृदयात प्रेम असेल, तर दयाळूपणाची गरज नाही. प्रेमच तुम्हाला या जीवनातून पार नेते.
वरच्या दिशेने जाण्यासाठी किंमत मोजावी लागते, पण खाली पडणे हे मोफत असते. तुम्हाला फक्त सुंदर जागी पडायला शिकायचे आहे - आणि सर्वात सुंदर जागा ही तुमच्या आत आहे.
जसा फुलाच्या बाबतीत सुगंध असतो, अगदी तसंच मानवाच्या बाबतीत प्रेम आहे.
जर तुम्हाला कोणत्याही कामात यश आणि आनंद हवा असेल, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पष्ट आकलन.
ध्यान म्हणजे एखादा विजय किंवा यश नाही - ते स्वगृही परतणे आहे. हे कुठेतरी जाण्याबद्दल नाही - ते फक्त स्वतःच्या आत परत येणे आहे.
जर 'तुम्ही कोण आहात' हे तुमच्या आत स्पष्टपणे प्रस्थापित असेल, तर लोक काय म्हणतात ते महत्त्वाचं असणार नाही.
तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी फक्त कच्चा माल दिला गेला आहे. तुम्ही त्यातून काय बनवता हे तुमच्यावर अवलंबून आहे.
तुमची परिस्थिती काहीही असो, दुःखी होण्याचे कारणच नाही. तुम्ही काही घेऊन आला नाही, त्यामुळे तुम्ही नेहमीच नफ्याच्या बाजूला आहात.
जर स्वतःच्या मुलांसाठी तुमच्या मनात प्रेम असेल, तर तुम्ही करू शकणारी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्यांना काहीही शिकवायला न जाता स्वतःवर काम करणे.
कदाचित आपण आपल्या सभोवतालच्या भौतिक परिस्थिती नेहमीच बदलू शकणार नाही. परंतु ज्या प्रकारे आपण त्या अनुभवतो, ते बदलण्यापासून कोणीही आपल्याला रोखू शकत नाही.