Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
जर एखाद्याने स्वतःच्या शरीराशी आणि मनाशी असलेली ओळख सोडून दिली, जी अन्न आणि संस्कार यांचा संचय आहे, तर त्याला आंतरिक स्थिरता जाणवेल. ध्यानमय होण्यासाठी एवढेच पुरेसे आहे.
मानवी शरीरापेक्षा मोठा रासायनिक कारखाना या पृथ्वीवर नाही. जर तुम्ही चांगले व्यवस्थापक असाल, तर त्यात आनंदाचं रसायन निर्माण करू शकता.
विजयादशमी म्हणजे अस्तित्वाच्या मूलभूत गुणांवर: तम, रज आणि सत्त्व यांच्यावर विजय मिळवणे. हा दिवस तुमच्यासाठी विजयाचा ठरू दे.
प्रेम हे कुणा एखाद्याबद्दल नसतं. प्रेम ही एखादी कृती नाही. तुम्ही 'ज्या प्रकारे आहात' तेच प्रेम आहे.
या जीवनाबाबत काही समस्या नाहीये. समस्या ही आहे की, तुम्ही मनाचं नियंत्रण तुमच्या हातात घेतलेलं नाहीये.
आपलं इथलं अस्तित्व फक्त थोड्या कालावधीसाठी आहे. आपण एकमेकांशी लढून ते कमी करू नये.
तुम्ही जर तुमची साधने - शरीर आणि मन यांच्यासहित - यांना आदराने वागवलं, तर प्रत्येक कृती एक आनंददायी आणि फलदायी प्रक्रिया बनते.
ज्याला देवीची कृपा प्राप्त होते तो धन्य होतो. मग तुम्ही असं जीवन जगाल जे तुमच्या कल्पनेच्या, वृत्तींच्या आणि क्षमतांच्या पलीकडे असेल.
प्रत्येक वेळी तुम्ही वेळ तपासता, तेव्हा लक्षात ठेवा, जीवन निघून जात आहे. खरोखर काय महत्वाचं आहे यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे.
हे जीवन जगण्याशिवाय इथं दुसरं काहीही नाही - तुमच्याकडे एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे उथळपणे किंवा सखोलपणे जगणे.
ज्यांनी सुरक्षित असण्याची आवश्यकता सोडली आहे, खरंतर तेच सुरक्षित आहेत.
शरीर आणि मन यांचा सखोलपणे संबंधित आहेत. शरीर स्थिर झाले की मग स्वाभाविकपणे मन तसेच बनते.