Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
आपल्या तर्काच्या पलीकडे जाणे हे मुक्त करणारे असते, पण ते सोडून देणे मात्र मूर्खपणाचे आहे.
तुमच्या आसपासच्या लोकांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न करू नका. ते तसेच आहेत. तुम्ही या एका जीवनाचा ताबा घ्या - तो म्हणजे स्वतःच्या.
कोणीही तुम्हाला मानसिक वेदना देऊ शकत नाही. ती वेदना तुमची स्वतःचीच असते - तुमच्या आसपास घडणाऱ्या गोष्टीवर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ती निर्माण होते.
जीवन सहज आहे; केवळ मन तणावाखाली असते.
स्वतःमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, जे घडले नाही त्याची तुम्हाला कल्पना करावी लागते. भीतीपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला काहीही करावे लागत नाही.
खरं तर महत्त्वाचं हे नाही की, लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुम्ही प्रेमळ आहात हे महत्वाचं आहे.
तुम्ही केवळ तुम्हाला आवडणाऱ्या किंवा प्रेम करणाऱ्या लोकांशीच बांधलेले नसता; जे लोक तुम्हाला आवडत नाहीत किंवा ज्यांचा तुम्ही तिरस्कार करता, त्यांच्याशी असलेले तुमचे बंधन त्याहूनही अधिक खोल असते.
वयानुसार तुमची शारीरिक चपळाई कदाचित कमी होऊ शकते; पण तुमचा जिवंतपणा कमी होण्याची गरज नाही.
गुरू तुमच्यातील अंधकार दूर करतात. ते स्वतः आतून प्रज्वलित असतात. तुम्ही देखील या ज्योतीने प्रज्वलित होऊन तुम्हाला मागे खेचणाऱ्या सर्व गोष्टींच्या पलीकडे जावे.
जर पूर्ण स्पष्टता असेल, तर धैर्याची गरज नसते. स्पष्टताच तुम्हाला पार घेऊन जाईल.
आपण सर्वजण आत्मज्ञानी म्हणूनच जन्माला येतो. अज्ञान ही एक निवड आहे.
स्वतःची तुलना इतरांशी करून आपले जीवन वाया घालवू नका. त्याऐवजी, तुम्ही कालच्यापेक्षा आज अधिक चांगले आहात का हे पहा.