Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
कंटाळा हा जीवनाशी समरस न झाल्यामुळे निर्माण होतो. तुम्ही स्वतःच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये हरवलेले असता.
तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता आणि इतर तुमच्याबद्दल काय विचार करतात याला अस्तित्वाच्या दृष्टीने काहीही महत्त्व नाही.
अध्यात्म म्हणजे एक छान, शांत जीवन जगणं असं समजू नका. त्याचा अर्थ ज्वलंत असणे असा आहे.
डोळे किंवा नाक यांचा आकार कसाही असो, एक आनंदी चेहरा हा नेहमीच एक सुंदर चेहरा असतो. आनंद बना - सुंदर बना.
तुमच्या जीवनात कोणताही पेचप्रसंग घडत असला तरी, तुम्ही स्वतःहून स्वतःसाठी पेचप्रसंग निर्माण करू नका.
हजारो वर्षांपासून, आपल्या नद्यांनी आईप्रमाणे आपल्याला कवेत घेतलं आहे आणि पालनपोषण केलं आहे. आता आपण त्यांना कवेत घेण्याची आणि त्यांचं पालनपोषण करण्याची वेळ आली आहे.
परिपूर्ण होण्यासाठी तुम्हाला काही करावं लागत नाही, कोणता विचार करावा लागत नाही, किंवा काही अनुभवावं लागत नाही. तुम्ही जसे आहात तसेच एक परीपूर्ण जीवन आहात.
दुसऱ्याने आपुलकी दाखवावी किंवा लक्ष द्यावे ही अपेक्षा न ठेवता सर्वांवर आपुलकीचा वर्षाव करू शकणे - हीच मुक्ती आहे.
अध्यापन हा एक व्यवसाय नसावा - ती एक आवड असली पाहिजे. तरच शिक्षण तथ्य लादण्यापासून सत्याच्या शोधाकडं जाऊ शकतं.
ताण हा काही जीवनाचा स्वाभाविक भाग नाही. स्वतःच्या यंत्रणेला हाताळण्याच्या असमर्थतेमुळे ताण येतो.
जेव्हा तुम्ही तुमच्या नश्वरतेला सामोरं जाता, फक्त तेव्हाच पलीकडे जाण्याची ओढ एक खरी शक्ती बनते. नाहीतर, आध्यात्मिक प्रक्रिया हे फक्त मनोरंजन आहे.