Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
केवळ तुमच्या भौतिक शरीराला सीमा लागते. तुमच्याबाबतचं बाकी सगळं वैश्विक असू शकतं.
प्रत्येक इतर प्राणी धरणीमातेच्या कल्याणासाठी काम करतो. फक्त आपण मनुष्यांना बदलायची गरज आहे.
तुमच्या जीवनाचा अनुभव तुम्ही कोण आहात किंवा तुमच्या भोवती काय आहे यावर नाही, तर तुम्ही तुमच्या आत कसे आहात यावर अवलंबून आहे.
जगासाठी तुम्ही करू शकणारी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे एक आनंदी आणि मस्त मनुष्य होणं.
उपकरणांचा विचार केला, तर एक कंप्युटर नाही, कार नाही किंवा अंतरीक्षयान नाही, तर मानवी मन हेच सर्वांत अद्भुत आहे - जर केवळ तुम्ही ते जागरूकपणे वापरलं तर.
अध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठी, तुम्ही फक्त कुठे जात आहात याबद्दल विचार केला पाहिजे, कुठून आलात आहात याबद्दल नाही.
जर तुम्हाला यश हवं असेल, तर सर्वांत मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः त्यामध्ये एक अडचण नाही आहात.
ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहित नाही त्याबद्दल गृहीतके निर्माण करणं हा अज्ञानी राहण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.
कर्म म्हणजे तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनाचे निर्माते आहात.
मनुष्य स्वतःला अति महत्व देत आहेत. इथे जे घडत आहे त्याचा आपण फक्त एक छोटासा भाग आहोत.
जग तुमच्या दिशेने काय फेकतं ते तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. पण तुम्ही त्यातून काय घडवता हे शंभर टक्के तुमच्यावर आहे. श्री राम याचेच मूर्तिमंत प्रतिक आहेत.
जगामध्ये प्रभावीपणे काम करण्यासाठी, ज्ञान नाही, तर आकलनाची स्पष्टता हा मुख्य घटक आहे.