About
Wisdom
FILTERS:
SORT BY:
जेव्हा राग तुमच्या दिशेनं केंद्रित असतो तेव्हा तो तुम्हाला आवडत नाही. मग तो इतरांकडे केंद्रित करून गोष्टी सुटणार आहेत असं तुम्हाला का वाटतं.
जर तुम्ही सत्याच्या संपर्कात असलात, तर तुमचे नातेसंबंध केवळ नातेसंबंध म्हणून राहतील, बंधनकारक होणार नाही. तुम्ही त्यात पूर्णपणे सहभागी असाल पण अडकून पडणार नाही.
प्रत्येक इच्छा ही खरंतर असीमिताची ओढ आहे, जी हफ्त्या हफ्त्यामध्ये व्यक्त होत आहे.
सुख म्हणजे एका पातळीचा प्रसन्न भाव आहे. आनंद ही आणखी वेगळी पातळी आहे. सुख सुंदर आहे, पण ते तुम्हाला गुलाम बनवते. आनंद अगदी छान आहे; मुख्य म्हणजे तो मुक्त करणारा आहे.
योगाने तुमचे शरीरच नाही, तर तुमचं मन आणि भावनासुद्धा लवचिक बनायला हव्या. मुख्य म्हणजे तुमचं चैतन्य लवचिक बनायला हवं.
एकदा का तुम्ही तुमच्या भूतकाळाला तुमच्या वर्तमानाचा अनुभव ठरवू दिलं, की मग तुम्ही तुमचे भविष्य नष्ट केले आहे.
जर तुमची आंतरिक स्तरावर प्रगती झाली, तर कुठलाही अभिमान उरणार नाही, आणि न्यूनगंडही नाही. तुम्ही पूर्णपणे समंजस पद्धतीने कृती कराल.
चैतन्याची प्रकृती अशी आहे की ते तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये, तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी प्रकट होत आहे.
जीवन तरल आहे, सतत विकसित होणारे आहे. तुम्ही जितके बदलण्यासाठी तयार असाल, तितक्या जास्त गोष्टी तुमच्या आयुष्यात सतत घडत जातील.
शरीर आणि मन या अस्तित्वाच्या अगदी वरवरच्या गोष्टी आहेत. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या फक्त तात्पुरत्या आहेत, तेव्हा तुम्ही तुमचं लक्ष अस्तित्वाच्या स्त्रोताकडे वळवाल.
जी काही तुमची विचार प्रक्रिया किंवा भावनिक प्रक्रिया असेल, त्या फक्त वायफळ गप्पा आहेत, फक्त तुमच्यापुरत्या मर्यादित. छान असतील तर त्याचा आनंद घ्या, पण त्यावर विश्वास ठेऊ नका.
तुम्हाला तुमच्या पालकांनी मानवी शरीर दिले आहे. तुम्हाला त्यांनी वाढवायला हवं आहे की तुम्हाला एका परिपूर्ण जीवन म्हणून बहरून यायचं आहे, ही तुमची निवड आहे.