About
Wisdom
FILTERS:
SORT BY:
ईश्वर हा निर्माता आहे, कुठला मॅनेजर नाही. मनुष्यांना स्वतःचे आयुष्य स्वतः हाताळण्याचे सौभाग्य लाभलेले आहे.
तुमच्या आत किती स्पष्टता आहे यावरून तुम्ही तुमचे आयुष्य किती यशस्वीपणे चालू शकाल ते ठरते.
सामाजिक बंधनांनी प्रभावित न होता, जेवढे जास्त तुम्ही स्वतः स्वतंत्र असाल, तेवढे जास्त तुम्ही तुमच्या मूळ प्रकृती पर्यंत पोहोचू शकाल.
मुळात, दु:ख म्हणजे तुम्ही अशा कशाचा विचार करत आहात किंवा तुम्हाला असं काहीतरी वाटत आहे, जे तुम्हाला आवडत नाही. आनंद म्हणजे तुम्हाला आवडणारं असं काहीतरी तुमच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये घडत आहे.
सद्गुरू ही अशी माती आहे ज्यावर तुम्ही वाढू शकता, फुलू शकता आणि तिच्यात विलीन होऊ शकता.
शंका घेणे आणि संशय घेणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संशय घेणे म्हणजे तुम्ही अनेक गोष्टी गृहित धरल्या आहेत - शंका घेणे म्हणजे तुम्ही सत्याच्या शोधात आहात.
तुमचा पैसा फक्त तुमची जीवनशैली ठरवू शकतो, तुमच्या जीवनाचं स्वरूप नाही. तुमच्या जीवनाचं स्वरूप, तुम्ही किती आनंदी आणि खुले आहात यावरून ठरते.
माती सर्व मातांची माता आहे. मातीला जिवंत ठेवणं आणि भावी पिढ्यांना त्याच अवस्थेत ती सुपूर्त करणं हा मातृत्वाची शक्ती जाणण्याचा मार्ग आहे.
आज तो दिवस आहे जेव्हा गौतम बुद्धांना लक्षात आले की सत्याकडे जाता येत नाही. जर तुम्ही त्याच्यासाठी उपस्थित असला, तर ते अगदी इथेच आहे.
जेव्हा तुमच्या स्मृती, तुमचा अनुभव आणि तुमची कल्पनाशक्ती सर्व काही मिसळून जातं, तेव्हा तुम्ही एक मोठ्ठा गोंधळ बनता.
आदर्शवाद स्वतःमध्ये असणं चांगलं. पण कृती वास्तवाशी सुसंगत असावी, अन्यथा ती व्यवहार्य किंवा यशस्वी ठरणार नाही.
लक्ष देण्याची पातळी उंचावणे माहिती मिळवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. लक्ष देण्याची क्षमता सुधारल्याने तुम्ही शेवटी चैतन्याचे स्वरूप बनता.