logo
logo

जेव्हा शिवानी आपले घर गमावले – बद्रीनाथची कथा

जेव्हा शिवानी आपले घर गमावले – बद्रीनाथची कथा

सद्गुरु बद्रीनाथ मंदिर आणि शिव व पार्वती यांना विष्णुने युक्तीने त्यांना त्यांच्या घरातून कसे बाहेर काढले यावर दृष्टिक्षेप घालत आहेत.

सद्गुरु: बद्रीनाथ बद्दल एक कथा आहे. हि अशी जागा आहे जिथे शिव आणि पार्वती रहात होते. हिमालयतील सुमारे 10,000 फूट उंचीवर हे एक सुंदर स्थान आहे. एक दिवस, नारदमुनी नारायण किंवा विष्णू यांच्या कडे जाऊन म्हणाले, “तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात. सतत आदिशेषावर पहुडलेले असता आणि आपली पत्नी लक्ष्मी सतत तुमची सेवा करून तुम्हाला बिघडवत आहे. या भूतलावरील जीवांसाठी आपण आदर्शवत नाही. सृष्टीतील सर्व जीवांसाठी आपण काहीतरी अधिक अर्थपूर्ण करणे आवश्यक आहे.”

या अशा टिके पासून वाचण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी काहीतरी करावे म्हणून विष्णु हिमालयाकडे गेले आणि साधना करण्यासाठी योग्य ठिकाण शोधू लागले. तेव्हा त्यांना बद्रीनाथ दिसले, साधनेसाठी त्यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टींनी युक्त अशी योग्य जागा आणि एक टुमदार घर.

ते त्या घरात गेले. पण त्यांना समजले कि हे शिवाचे निवासस्थान आहे आणि तो धोकादायक आहे. त्याला राग आला तर तो केवळ तुमचा गळाच नव्हे तर स्वतःचा देखील गळा कापून घेईल, हा माणूस खूप धोकादायक आहे.

म्हणून नारायणांनी बालरूप घेतले आणि ते त्या घरासमोर बसले. शिव आणि पार्वती जे बाहेर गेले होते ते परत आले. आल्यावर त्यांनी दारात रडत असलेल्या लहान मुलाला पाहिले. कळवळून रडणाऱ्या त्या मुलाला पाहून पार्वतीच्या मातृसुलभ भावना जागृत झाल्या आणि तिला त्या बाळाला उचलून घेण्यासाठी पुढे गेली. शिवाने तिला थांबवले आणि म्हणाले,” त्याला स्पर्श करू नकोस” पार्वती म्हणाली “ तुम्ही असे कसे म्हणू शकता? किती निष्टुर आहात”

शिव म्हणाले, “हे बालक काही चांगले वाटत नाही. हे स्वतःहून आपल्या दारात कुठून आले? आजूबाजूला कोणीही दिसत नाही, बर्फात त्याच्या पालकांच्या पाऊलखुणा देखील नाहीत. हे बालक नाही”. पार्वती म्हणाली “ते काही मला माहित नाही माझ्यातली आई मला असे सोडू देणार नाही” आणि तिने त्या बालकाला उचलून घरात आणले. तिने मांडीवर घेतल्याने आता ते बालक शांत झाले होते, आणि आनंदाने शिवाकडे पहात होते. शिवाला या गोष्टीच्या परीणामाची कल्पना होती म्हणून ते म्हणाले “ ठीक आहे, पाहू काय होते ते.”

पार्वतींनी त्याचे सांत्वन करून त्याला खाऊ दिले, त्याला घरात ठेऊन जवळच गरम पाण्याचे झरे होते तिथे शिवांसोबत स्नानाला गेली. परत आल्यावर पाहिले तर घर आतून बंद होते. पार्वती आश्चर्यचकित झाली. “ दार कोणी बंद केले असेल?” शिवा म्हणाले “मी तुला सांगत होतो, त्या मुलाला घरात घेऊ नकोस. तू त्याला घरात आणलंस आणि आता त्याने दाराला कुलूप लावले.”

पार्वती विचारू लागली, “ आता काय करायचे?”

शिवांकडे दोन पर्याय होते: एक म्हणजे संपूर्ण घर जाळून भस्मसात करणे. आणि दुसरा म्हणजे घर सोडून दुसरीकडे जायचे. म्हणून ते म्हणाले, ”आपण दुसरीकडे जाऊ. कारण ते बालक तुझे लाडके असल्याने मी त्याला काही करू शकत नाही.

अशा तऱ्हेने शिवाला स्वतःचे घर गमवावे लागले आणि शिव पार्वती “बेघर झाले”! आजूबाजूच्या परिसरात राहण्यासाठी योग्य जागेचा शोध घेऊ लागले आणि त्यांनी केदारनाथ निवडले केली. तुम्ही विचाराल त्याला हे ठाऊक नव्हते काय? बऱ्याच गोष्टी माहित असूनही आपण त्यांना होऊ देतो.

    Share

Related Tags

शिव आणि त्याचे कुटुंबशिवाच्या कथा

Get latest blogs on Shiva

Related Content

सात कडवी दहा मिनिटात सद्गुरुंकडून