सद्गुरू अलीकडेच एका जीवघेण्या परिस्थितीतून सुखरूप पार पडले आहेत. त्यांच्या प्रकृतीत सध्या चांगल्या प्रकारे सुधार होत आहे. 

सद्गुरूंना गेल्या चार आठवड्यांपासून तीव्र डोकेदुखी होती. तीव्र वेदना होत असतानाही, त्यांनी त्यांचे कार्यक्रम आणि काम चालू ठेवले, आणि ८ मार्च २०२४ ला महाशिवरात्री इव्हेंट सुद्धा पार पाडला. 

 त्यांची डोकेदुखी १४ मार्च २०२४ ला दुपारी दिल्लीला पोहोचल्यावर अधिक तीव्र झाली. डॉ. विनीत सुरी, ज्येष्ठ सल्लागार न्यूरोलॉजिस्ट, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, यांच्या सल्ल्यानुसार त्याच दिवशी दुपारी ४:३० वाजता त्वरित एम.आर.आय करण्यात आला, ज्यामध्ये मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे समजले. त्यामध्ये यापूर्वी ३-४ आठवड्यांसाठी आणि तपासणीपुर्वीच्या २४-४८ तासांमध्ये तीव्र रक्तस्त्राव झाल्याचे समजले. 

सद्गुरूंना त्वरित रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला गेला, पण ते म्हणाले की “मी गेल्या ४० वर्षांमध्ये एकही मीटिंग चुकवली नाही”. तीव्र वेदना होत असतानाही, त्यांनी १५ मार्चच्या सर्व निर्धारित मीटिंग पार पाडल्या आणि १६ मार्चला इंडिया टुडे कॉनक्लेव्ह मध्ये पेन किलर औषधांच्या उच्च डोसच्या मदतीने भाग घेतला. 

१७ मार्च २०२४ ला, सद्गुरूंच्या मज्जासंस्थेची प्रकृती झपाट्याने खालावू लागली, डाव्या पायाची शक्ती कमी होऊ लागली, आणि पुन्हा पुन्हा उलट्या होऊ लागल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. सी.टी मध्ये मेंदूची सूज पुष्कळ वाढलेली दिसली आणि मेंदू एका बाजूला कलण्याची जीवघेणी परिस्थिती दिसून आली.   

सद्गुरूंची काळजी डॉक्टरांची एक टीम घेत होती ज्यामध्ये डॉ. विनीत सुरी, डॉ. प्रणव कुमार, डॉ. सुधीर त्यागी आणि डॉ. एस चॅटरजी होते. १७ मार्चला त्यांच्यावर मेंदूत झालेल्या रक्तस्त्रावाचे रक्त काढून टाकण्यासाठी त्वरित शस्त्रक्रिया करण्यात आली. सद्गुरूंना शस्त्रक्रियेनंतर हळूहळू व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले.   

सद्गुरूंच्या प्रकृतीत स्थिर स्वरुपाची प्रगती दिसत आहे आणि त्यांच्या मेंदूची आणि शरीराची सर्व आवश्यक परिमाणं सामान्य पातळीपर्यंत आली आहेत. त्यांच्या प्रकृतीतला सुधार अपेक्षेपेक्षा खूप चांगला आहे आणि आणि डॉ विनीत सुरी म्हणाले की “आमच्या वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त, सद्गुरू सुद्धा स्वतःची प्रकृती सुधारत आहेत.”