Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
ताण हा जीवनातील परिस्थितींमुळे नसतो, तर स्वतःचे व्यवस्थापन कसे करावे हे तुम्हाला माहीत नसल्यामुळे असतो.
जेव्हा तुमच्या आतील जीवनाचा स्रोत हाच तुमच्याकरिता सर्वोच्च अधिकार असतो, तेव्हा तुमच्या सभोवतालची मते आणि निष्कर्ष यांना काही महत्त्व उरत नाही.
ज्याने स्वतःच्या आंतरिक निश्चलतेला स्पर्श केलेला नाही, तो गतीमध्ये हरवून जाईल.
विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे एकाच नावेत असतात. एक सकारात्मकपणे विश्वास ठेवतो, तर दुसरा नकारात्मकपणे. दोघेही हे मान्य करायला तयार नसतात की, त्यांना माहीत नाहीये.
तुमचे विचार आणि भावना हीच तुमची भुतं आहेत. तुम्हीच त्यांची निर्मिती करता आणि मग ती नियंत्रणाबाहेर जाऊन तुम्हाला पछाडतात. हा एक वाईटपणे दिग्दर्शित केलेला भयपट आहे.
माहिती मिळवता येऊ शकते. जाणून घेणे हा एक साक्षात्कार आहे. शहाणपण, कमवावे लागते, आणि त्यासाठी संपूर्ण जीवन खर्ची पडते.
तुमचे विचार म्हणजे फक्त पुन्हा पुन्हा वापरली जाणारी संकलित माहिती. तिथे खरोखर काहीही नवीन घडू शकत नाही.
जर तुम्हाला तुमचं काम महत्त्वाचं वाटत असेल, तर तुम्ही स्वतःवर काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे जीवन घडवण्याचे सामर्थ्य असणे; ते दुसऱ्या कशानेही ठरवले न जाणे.
जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून देता आणि काय घडेल किंवा घडणार नाही याची काळजी करत नाही, तेव्हा तुमचं जीवन सुंदर बनतं. जीवनाचा आनंद हा स्वतःला व्यक्त करण्यात आहे, याचना करण्यात नाही.
कठीण परिस्थिती ही एक अशी अवस्था आहे ज्यातून आपण जातो. दुःख ही अशी अवस्था आहे जी आपण स्वतः निर्माण करतो.
मला जे काही ज्ञात आहे, माझ्या गुरूंना जे ज्ञात होतं आणि संपूर्ण आध्यात्मिक परंपरेला जे ज्ञात होतं, ते सर्व काही ध्यानलिंगामध्ये ऊर्जेच्या स्वरूपात आहे. मी फक्त एक परिणाम आहे.