तुमची नोकरी, व्यवसाय हे काळाशी निगडित आहेत. आपले शरीर सुद्धा काळाशी निगडित आहे. दिवसातून २४ तास तुम्ही आनंदी राहू शकत नाही, तसे राहू शकता पण त्याला एका प्रक्रियेची गरज आहे. आनंदी असाल तर काळ कसा सहज निघून जातो, पण तेच जर तुम्ही आनंदी नसाल तर काळ हा फार लांबचा प्रवास वाटतो. अध्यात्म हे काळाशी निगडित नाही. थोड्या मार्गदर्शनाची गरज आहे, मग ते आपोआप घडत जाते.