Main Centers
International Centers
India
USA
FILTERS:
SORT BY:
Clear All
जर तुम्ही 'स्व' मध्ये पूर्णपणे गुंतले असाल, तर जीवनाने तुम्हाला चांगलेच मळावे लागते. त्याशिवाय दुसरा कोणताही उपचार नाही.
पूर्णपणे जिवंत असणे हे अद्भुत आहे. अर्धवट जिवंत असणे ही यातना आहे.
आनंद हे काही ध्येय नाही – तो दुःखाची भीती दूर करतो. 'माझं काय होईल?' ही भावना जेव्हा नाहीशी होते, तेव्हाच तुम्हाला जीवन अनुभवण्याचे धाडस करता येईल.
आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे तुमची आंतरिक बुद्धिमत्ता जागृत आहे. वेळ मर्यादित आहे. जे काही घडणं आवश्यक आहे, ते आत्ताच घडलं पाहिजे.
मी असा घडलेलो नाही की, स्तुतीने हुरळून जाईन आणि टीकेमुळे खचून जाईन. हा अधिकार मी कोणालाच दिलेला नाही.
तुमचं जीवन हे तुमचंच कर्म आहे - ते तुम्ही स्वतः घडवलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही हे पाहू शकत नाही, तोपर्यंत तुमचं जीवन खऱ्या अर्थाने तुमचं नसतं.
शरीर आणि मन हे प्रगतीच्या पायऱ्या ठरायला हवे होते; त्याऐवजी, ते अशा दलदलीत बदलले आहेत ज्यात लोक जीवनभर रुतून पडतात.
प्रेममय बना. अस्तित्वात असण्याचा हा एक सुज्ञ मार्ग आहे.
वासना ही एक तीव्र गरज असते. प्रेम ही गरज नसून एक ओढ असते. जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही स्थिरावता - त्यानंतर कशाचीही गरज उरत नाही.
जी व्यक्ती मरायला तयार असते, केवळ तीच संपूर्णपणे जगू शकते.
जेव्हा एखादे कर्म समर्पणाशिवाय केले जाते, तेव्हा ते बंधनास कारणीभूत ठरते; परंतु जेव्हा ते संपूर्ण समर्पणाने केले जाते, तेव्हा ते मुक्तीकडे नेते.
आपल्या तर्काच्या पलीकडे जाणे हे मुक्त करणारे असते, पण ते सोडून देणे मात्र मूर्खपणाचे आहे.