FILTERS:
SORT BY:
Clear All
जर 'तुम्ही कोण आहात' हे तुमच्या आत स्पष्टपणे प्रस्थापित असेल, तर लोक काय म्हणतात ते महत्त्वाचं असणार नाही.
प्रेम म्हणजे एखाद्याला तुमच्यात सामावून घेण्याची ओढ - तुम्ही कोण आहात याची सीमा स्वतःच्या पलीकडे वाढवणे.
तुम्ही या जीवनामुळे दुःख भोगत नाही आहात. तुम्ही तुमची स्मृती आणि कल्पनाशक्ती यांच्यामुळे दुःख भोगत आहात.
तुम्हाला ज्या गोष्टींची काळजी आहे, त्याबद्दल खरोखरच समर्पित असाल, तर संपूर्ण जग तुम्हाला पाठिंबा देईल.
कदाचित आपण आपल्या सभोवतालच्या भौतिक परिस्थिती नेहमीच बदलू शकणार नाही. परंतु ज्या प्रकारे आपण त्या अनुभवतो, ते बदलण्यापासून कोणीही आपल्याला रोखू शकत नाही.
एका शक्यतेकडून दुसऱ्या शक्यतेकडे जाणे हेच जीवनाचे स्वरूप आहे. पण तुमची मानसिक चौकट जीवनापेक्षा परिचित असणाऱ्या आरामाची निवड करते.
इथे नेहमीच एक पायरी वर चढण्यास वाव असतो. म्हणूनच हे जीवन जगण्यासाठी सार्थक आहे.
जर तुमची बुद्धिमत्ता तुमच्यासाठी काम करत असती, तर तुम्ही स्वतःला दुःखी करून घेतलं नसतं. तुम्ही तुमच्या आत सर्वोत्तम गोष्ट निर्माण केली असती - आणि बाहेर, सर्वोत्तम कामगिरी केली असती.
गाणे, नृत्य किंवा काम असो - जर तुम्ही स्वतःला पूर्णपणे विसरून त्यात झोकून दिले, तर तुमचे जीवन अद्भुत होईल.
तुमचा धर्म, वंश किंवा जात काहीही असो - जर तुम्ही मानव आहात, तर महाशिवरात्री तुमच्यासाठी आहे. आंतरिकतेकडे वळण्याचे शास्त्र तुमच्यासाठी आहे, कारण मानवी कल्याण आतूनच निर्माण होते.
संगीत एक शोध असावा, जीवनाला समृद्ध करणारं असावं. जर ते यांत्रिक झालं, तर यंत्रे त्याचा ताबा घेतील - जे नेहमीच यांत्रिक काम अधिक चांगलं करतील.
तुम्ही किती काळ जगता यापेक्षा जीवनाची संपूर्ण क्षमता ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे.