FILTERS:
SORT BY:
Clear All
जेव्हा तुमचे हृदय तृप्त आणि मन 'स्व'पासून मुक्त असते, तेव्हा तुमचे पाय आपोआप नाचू लागतील.
जोडीदार हे अंतिम साध्य नसून, सहप्रवासी आहे.
हे शरीर पृथ्वीचाच एक अंश आहे. निरोगी पृथ्वीशिवाय चांगले जीवन शक्य नाही.
केवळ मूर्ख लोकच उथळ चर्चेमुळे दुखावले जातात. अशी चर्चा करणारे मात्र स्वतःचेच सर्वाधिक नुकसान करून घेत असतात.
तुम्ही हजार वर्ष जगलात तरीही मानवी कल्पनाशक्ती आणि आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत. तर मग आपण 'आनंदी अपयशी' होऊया.
स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्ही ज्या भिंती उभारता, त्या काळानुरूप तुमच्यासाठी कारागृहाच्या भिंती बनतात
विश्वासाचा अर्थ असा नाही की, इतरांनी गोष्टी अगदी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच केल्या पाहिजेत. विश्वास म्हणजे जाणीवपूर्वक असुरक्षित असणे.
तंत्रज्ञान मानवापेक्षा अधिक वेगाने विकसित होत आहे. जोपर्यंत आपण तंत्रज्ञानापेक्षा अधिक वेगाने विकसित होत नाही, तोपर्यंत आपण त्याचा वापर कधीच सुज्ञपणे करू शकणार नाही.
अपराधबोध ही समाजाने जोपासलेली एक भावना आहे — स्वतःच्याच दिशेने रोखलेलं एक विष.
जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्मृतींमध्येच वावरता, तेव्हा तुमच्या समोर काय आहे हे तुम्ही पाहू शकत नाही.
तीच समस्या पुन्हा पुन्हा उद्भवत आहे, याचा अर्थ तुम्हीच समस्या आहात.
बरीचशी माणसं स्वतःच्या आत असणाऱ्या आंतरिक प्रतिभेला कधीही स्पर्श न करताच जगतात आणि मरतात.