Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
भीती आणि अज्ञान हे कायमच एकत्र असतात. जाणण्यातून निर्माण झालेली स्पष्टता एखाद्याची भीतीपासून सुटका करू शकते.
जर तुम्हाला तुमचं जीवन किती नाजूक आहे आणि ते कुठल्याही क्षणी कसं उलटं पालटं होऊ शकतं हे लक्षात आलं, तर तुम्ही या धरतीवर अगदी हळुवारपणे पाऊल ठेवाल.
समावेशकता हा अस्तित्वात असण्याचा जास्त बुद्धिमान मार्ग आहे कारण संपूर्ण अस्तित्व त्याच प्रकारे घडत आहे.
जंगलांसाठी इतर कुठलाही पर्याय नाही. या परीसंस्था आपल्या हस्तक्षेपाशिवाय लाखो वार्शनासाठी टिकून आहेत. त्यांचं शोषण थांबवण्याची आता वेळ आली आहे.
तुमचं जगाला योगदान म्हणजे तुम्ही स्वतः - तुम्ही कसे जगता, तुम्ही किती आनंदी आहात, या सगळ्याचा प्रभाव पडतो.
जर तुम्हाला जीवनाचा मूळ हेतू जाणायचा असेल, तर तुम्हाला शरीर आणि मनाच्या सीमांपलीकडे पहावं लागेल.
या धरतीवर पाण्याची कमतरता नाही - हा प्रश्न फक्त गुणवत्ता, वितरण आणि त्यापर्यंत पोहोचता येण्याचा आहे. एकमेव उपाय म्हणजे जगामध्ये जागरूकतेचा एक महापूर निर्माण करणं.
ध्यान म्हणजे तुमच्या आतलं परम स्वातंत्र्य.
जीवन आतून घडतं. तुम्ही किती जागरूक आहात, तेच तुमच्या शरीर, मन आणि जीवनाच्या अनुभवाचं स्वरूप ठरवतं.
विषुव म्हणजे तुमच्या यंत्रणेत संतुलन आणण्याचा दिवस आहे - या किंवा त्या गोष्टीसोबत आपली ओळख बांधून घेणं नाही, तर नुसतं जीवनशक्तीने स्पंदित इथे अस्तित्वात असणं.