आजकाल बरेच लोक आपल्या अडी-अडचणीपासून मुक्त होण्यासाठी आणि इच्छापूर्तीसाठी ज्योतिषांच्या पाठिमागे धावताना आपण पाहतो. सदगुरू म्हणतात..... तुम्हाला उद्याबद्दल कळण्याची गरज नाहिये. तुम्ही आत्तासाठी असे घडला आहात. तुमच्या जीवनाची क्वालीटी आणी तुमचे अस्तित्व असं आहे की जर तुम्हाला उद्याबद्दल कळल तर तुम्ही आज मध्ये सहभाग घेणार नाही. हो ना? हो की नाही? जर मी तुम्हाला म्हणालो , “तुम्ही काही केल तरी, तुम्ही मरणार नाही.” तेव्हा तुम्ही या जगात बेजबाबदार गोष्टी करणार. किंवा मी जर तुम्हाला म्हणालो, “उद्या सकाळी, तुम्ही कसे ही मरणार” आता तुम्ही आजमध्ये सहभागी नाही होणार, हो ना? म्हणून, तुम्हाला भविष्य कळता कामा नये. तुम्हाला भविष्य कळण्याची गरज नाहिये.